शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

19 February 2012

                दिनचर्या 
प्रभात समयी कर्णकर्कश गजर वाजती!
अंगावरचे पांघरलेले त्यासव दूर होती!!
बहु वाटे पडुनी राहावे आणखी थोडे काले!
परी लागे उठावे टाकोनी आळस नाईलाजे!!
होती प्रारंभ तदनंतर प्रातःकालची कार्ये!
यंत्रवयत होती सर्वे तोची काले तोची क्रमे!!
तेल लावू केस विंचरू अंती वस्त्रे चढवुनी!
करितो दिनआरंभ श्री अथर्वशिर्ष वाचोनी!!
कडीकोयंडा करू घरा निघतो ठेवुनी रिक्त!
घर म्हणतो त्यासी चार भिंती वर छत फक्त!!
कार्यशाळेत घालवूनी वेळ परतितो घरी!
ताजातवाना होऊनी करितो उद्याची तैयारी!!
सर्व आवरता उरतो वेळ आता नाही खैर!
विचार ऐसे थैमान मांडती करिती बेजार!!
बेधुंदीत त्याच निघतो करण्यास रात्रौभोज!
धुंदीची नाशहि कैसी अर्जुनावस्था खाशी!
मार्गाती वर्दळ भारी गोंगाट नि तुफान गर्दी!
खिजगणतीत नसे हे नजर ती आत्मकेंद्री!!
कधी आवडती कधी नावडती ताटीत भाजी!
तक्रार ती करू कोणा अंती पराठा-दही तरी!!
शतपावले होता होता आली दिनचर्या अंती!
तैसे मी, एकटेपणा अन दूरदर्शन साथी!!
पांघरून घेउनी करितो निद्रेची आराधना!
करण्या दिनआरंभ  पुनः गजर वाजताना!!

No comments: