शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

02 August 2010

वैचारिक वाटचाल
१ ऑगस्ट, बहुतांशी लोकांनी साजरा केला तो फ्रेंडशिप डे म्हणूनच. बरयाच लोकांना जरी विचारलं तरी सांगता येणार नाही तरी पण एक प्रथा किंवा एक (अंधा) अनुकरण म्हणून साजरा केला तो दिवस.
नाही साजरी केली ती एका जहाल स्वातंत्र्य सेनानिची पुण्यतिथी. कोण होती ती व्यक्ती हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक, जहाल विचारवादी, सार्वजनिक गणेशउत्सवाचे प्रणेते श्री बाल गंगाधर टिळक.
थोडी फार वाटतेय का नाही आजूनपण ..............! थोड वाकून बघा तुमच्या मनामध्ये, आत्मकेंद्रित होऊन जरा विचार करा नक्की आपल्याला जायचं कुठ आणि चाललोय कुठ?