शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

22 October 2010

मती जिथ गहन पडते


                                                          या माणसाला काय म्हणायचं तेच समजत नाही?  मुंबई वर हमाला झालेल्या रात्री मित्राच्या पार्टीत नाचणारा हा आम्हाला शहाणपणा शिकवतोय. म्हणे आम्ही महाराष्ट्रीय लोक आळशी आहोत, आम्ही झोपतो आणि सगळी काम बिहारी करत असतात, बरोबरच आहे  दिवसभर इमानाने काम केल्यावर रात्री आम्ही झोपतो आणि याची बिहारी पिलावळ रात्री चोऱ्या आणि दरोडे घालते. म्हणतोय तरी काय उत्तर भारतीय आणि हिंदुस्थानी लोकच मेट्रो सारख्या प्रकल्पावर काम करताहेत याचा अर्थ काय तर आम्ही महाराष्ट्रीय लोक एक तर भारतीय नाही आणि भारत फक्त त्या उत्तर भारतापुरता मर्यादित आहे. मग कशाला तोंड वर करून हिकड मरायला येताय. काय काबाड कष्ट करायचं ते तिथ बिहारात आणि उत्तर भारतात करा की. अरे ज्या लोकसभा मतदार संघातून याचं आख्खं खानदान निवडून येत आलंय त्या उत्तरप्रदेशातील मतदार संघाचा याला उत्कर्ष करता आला नाही आणि निवडणूक आल्यावर त्याच उत्तर भारतीयांची बाजू घेऊन सांगतोय तेच कष्ट करताहेत म्हणून तर आम्ही उभे आहोत. असेल जर दम दाखव म्हणाव उत्तर प्रदेश आणि बिहारला वर आणून. अरे गांधी आडनाव म्हणून लोक तुला थोडेफार ओळखतात नाही तर राहुल नामक व्यक्ती त्याच बिहाऱ्यासांरखी कुठेतरी काबाड कष्ट करीत असली असती.
                                                          धर्मनिरपेक्ष म्हणून धर्माचा राजकारण करणारा पक्ष, तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करायची.