शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

25 August 2010

आणखी एक कोडे...............?

मनुष्यप्राणी! म्हणे सर्वात बुद्धिमान प्राणी! स्मृतीदेखील विलक्षण, समाजप्रिय प्राणी.
पण का बर ह्याच प्रत्यंतर सहसा मिळत नाही?
का बर काही कालावधीतच मनुष्यच मनुष्याच्या विस्मृतीत जातो?
जाणते अजाणते थोड्याफार काळात मनुष्य आपल्या गतकाळाच्या सर्व मृत-जीविताना मूठमाती देऊन समोर येऊ घातलेल्या नवीन मृत-जीविताना आपलासे करतो.
असं समजावं का, की ते स्मृतीपल्याड गेलेले ते कदाचित त्याला भावले नसतील, कधी आपलेसे वाटली नसतील. पण तसं तरी कधी जाणवलं नाही. ज्याच्याबरोबर आयुष्याची काही वर्षे व्यतीत केली असतील, जरी सगळेच भावले नसले तरी थोडे तरी त्याच्या जवळचे असतील तरीदेखील का हि विस्मृती?
आणखी एक कोडे...............?
पुढील आयुष्यात उत्तर शोधण्यासाठी.......