शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

02 August 2010

वैचारिक वाटचाल
१ ऑगस्ट, बहुतांशी लोकांनी साजरा केला तो फ्रेंडशिप डे म्हणूनच. बरयाच लोकांना जरी विचारलं तरी सांगता येणार नाही तरी पण एक प्रथा किंवा एक (अंधा) अनुकरण म्हणून साजरा केला तो दिवस.
नाही साजरी केली ती एका जहाल स्वातंत्र्य सेनानिची पुण्यतिथी. कोण होती ती व्यक्ती हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक, जहाल विचारवादी, सार्वजनिक गणेशउत्सवाचे प्रणेते श्री बाल गंगाधर टिळक.
थोडी फार वाटतेय का नाही आजूनपण ..............! थोड वाकून बघा तुमच्या मनामध्ये, आत्मकेंद्रित होऊन जरा विचार करा नक्की आपल्याला जायचं कुठ आणि चाललोय कुठ?

22 July 2010

जाणीव

एक अनामिक भीती वाटतेय, पदोपदी एकटेपणाची जाणीव होतेय!
बंर, म्हंटल बघू तरी नक्की वाटतेय कशाची भीती,
पण सापडलंच तर ती भीती कसली अन आम्ही मानस कसली!!!!!!

03 July 2010


आठवणी न विसरू शकतो , न पकडून ठेऊ शकतो,
बरया न झालेल्या जखमेवरील खपली प्रमाणे, आठवणी हि दुखरया असतात,
खपली निघाली कि, भळाभळा रक्त वाहू लागते, अन टचकन डोळ्यात आसव आणत,
आठवणी, सुखद व दुखद क्षणाच्या, आल्याच; तर आहेच भळाभळा वाहने आश्रुंचे,
नयनातुनी आमच्या, परी! परवडले ते वहाणे रक्ताचे जखमेतुनी .